कोल्हापूर/ग्लोबल मार्केट न्यूज नेटवर्क : सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या सौ. शारदा भगवान कांबळे (दिंडनेर्ली) यांचा मान्यवरांच्या हस्ते आदर्श पोलीस पाटील पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
कवी सरकार स्वाभिमानी वाचन मंदिर इंगळी यांच्या वतीने आयोजित साहित्यिक कै.प्रा.डॉ.सुरेश कुराडे यांच्या स्मृती पित्यार्थ कोल्हापुरातील करवीर नगर वाचन मंदिर येथील सभागृहात राज्यस्तरीय चौथे मिरग नक्षत्र कवी संमेलन घेण्यात आले. या संमेलनाला विविध ठिकाणाहून मान्यवर उपस्थित होते. यावेळी विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तींचा मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील दिंडनेर्ली इथल्या सौ. शारदा भगवान कांबळे यांचे सामाजिक क्षेत्रातील कार्य उल्लेखनीय आहे. या कार्याबद्दल त्यांना राजर्षी शाहू महाराज आदर्श पोलीस पाटील पुरस्कार देण्यात आला. या पुरस्कारानंतर त्यांचे सामाजिक क्षेत्रात कौतुक आणि अभिनंदन करण्यात येत आहे.